Anuradha Vipat
देवघरातील नारळाला कोंब येणे ही शास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते.
नारळाला कोंब येणे हे सुख, समृद्धी आणि घरात नवीन पाहुण्याचे किंवा नवीन कार्याचे आगमन मानले जाते.
कोंब आलेल्या नारळाला फोडू नये किंवा पाण्यात विसर्जित करू नये.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तो नारळ एखाद्या कुंडीत किंवा बागेत जिथे माती आहे तिथ लावावा.
तो नारळ जोपर्यंत तुम्ही लावत नाही, तोपर्यंत त्याची नियमित पूजा करावी आणि त्याला 'कलश' स्वरूपात मान द्यावा.
निसर्गाच्या नियमानुसार सजीवतेचे लक्षण म्हणजे कोंब येणे, जे प्रगतीचे लक्षण आहे.
देवघरातील नारळाला कोंब येणे हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे.