Team Agrowon
पावसाचे कमी-अधिक, अनियमित प्रमाण, तापमान, आर्द्रतेचा आरोग्यावर परिणाम.
अधिक तापमान व आर्द्रतेमुळे उष्णतेचा ताण वाढतो. त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते, भूक मंदावते दुग्धोत्पादन कमी होते, प्रजननक्षमता घटते, दुधाची गुणवत्ता ढासळते.
कितनबाधेसारखे चयापचयाचे आजार, आम्ल अपचन, लंगडणे यांसारख्या व्याधी जडतात.
अनियमित पाऊस, अतिवृष्टीमुळे कीटक, बाह्यपरजीवींचे प्रमाण वाढते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, जिवाणूजन्य आजाराच्या साथी येतात. प्राणिजन्य आजारांचे प्रमाणही वाढते.
पाऊस, वातावरणातील तापमान व आर्द्रता यांच्यामध्ये चढ उतार झाल्याने जनावरांना वातावरणातील बदलाच्या विविध ताणास सामोरे जावे लागते.
कमी पाऊस व अधिक तापमान राहिल्यास चाऱ्यामध्ये लिग्नीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता घटते.
कमी पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन कमी होते. त्यातून चारा व खाद्य टंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते.