Anuradha Vipat
माठातील पाणी पिणे हे केवळ नैसर्गिकरीत्या थंड नसते, तर ते आरोग्यासाठी अमृतासमान मानले जाते.
मातीच्या माठात लहान छिद्रे असतात, ज्यातून पाण्याचे बाष्पीभवन होते. या प्रक्रियेमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते.
माती निसर्गतः अल्कधर्मी असते. जेव्हा मातीचा संपर्क पाण्याच्या आम्लारीशी येतो, तेव्हा पाण्याचे pH संतुलन राखले जाते.
मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते आणि चयापचय शक्ती वाढते.
फ्रिजमधील अतिशय थंड पाण्यामुळे घसा बसणे किंवा खोकला होऊ शकतो.
मातीमध्ये अशुद्धता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे माठात पाणी साठवल्याने त्यातील विषारी घटक कमी होतात
उन्हाळ्यात माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील खनिजे आणि जीवनसत्त्वे टिकून राहतात, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.