Aslam Abdul Shanedivan
सध्या जगभरात प्रदूषणाची समस्या सगळ्याच देशांना सतावत आहे. आपल्या देशातही यावर उपाय केले जात असून महाराष्ट्र राज्य सरकार यावर मोठे नियोजन करत आहे
पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यासाठी बांबू टास्क फोर्स गठीत केली असून याची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी बांबू लागवड केल्यास मोठा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळेल असे शिंदे म्हणाले.
बांबू लागवड करण्याकरिता कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे असेही शिंदे म्हणाले
तसेच यासाठी आवश्यक निधी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट्य बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येणार आहे
तसेच बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना बँकांकडून अडवणूक होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.