Aslam Abdul Shanedivan
वाढलेल्या महागाईपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेताना, 'भारत' ब्रँडच्या तांदूळ सामान्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने 'भारत' ब्रँडच्या तांदळाला २५ रुपयात विकण्याचा निर्णय घेतला आहे.
नाफेड आणि एनसीसीएफच्या भांडारांमधून ही विक्री होणार आहे.
बासमती तांदूळ २५ रुपये किलोने सरकार देणार अशी घोषणा असली तरी सध्या बासमतीचे भाव ५० वर पोहोचले आहेत.
तसेच बाजारपेठेत तांदळाच्या किंमती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवण केली जाते. यावरून व्यापाऱ्यांना कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता.
तांदूळ विक्रीला चालना देण्यासाठी ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) आणली गेली आहे. यातंर्गत बाजारपेठेतील तांदळाचा साठा वाढविण्यात येणार आहे.
भारतात ४० टक्क्यांपेक्षा अधिक भात पिकवला जातो. तर यंदा कमी झालेल्या पावसामुळे तांदळाचे क्षेत्र घटले आहे. यंदा धान्य कोठारामध्ये ४७.२ मेट्रीक टन तांदळाचा साठा असून तो साडेतीन पटीने कमी आहे.