Mahesh Gaikwad
देशभरात काही दिवसातंच मॉन्सून सरींचे आगमन होणार आहे. परंतु अजूनही देशातील विविध भागात सुर्य आग ओकत आहे.
उत्तर भारतासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत.
अशातच अति उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि अतिसाराचा त्रास अनेकांना होत आहे.
उन्हाळ्यात तुम्हालाही अतिसाराचा त्रास होण्याची शक्यता असेल अथवा झाला असेल, तर त्याआधी त्याची लक्षणे दिसून येतील.
जुलाब होणे, मळमळ होणे किंवा शरीरातील पाणी कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन अशी लक्षणे दिसू लागतील.
तसेच पोटामध्ये गंभीर वेदना होणे आणि ताप येण्यासारखी लक्षणेही दिसू लागतील. अशी लक्षणे दिसायला लागताच त्वरित उपचार करा.
अशा परिस्थितीत मसालेदार अन्न, दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. तसेच कॅफिन आणि अल्कोहोल घेणेही टाळले पाहिजे.
आहारामध्ये डाळीची खिचडी किंवा अगदी साधा आहार घ्यावा. तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे.