Anuradha Vipat
उन्हाळ्यात गरम हवा आणि घामामुळे शरीरातील ओलावा कमी होतो, ज्यामुळे टाचांना भेगा पडतात.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि टाचा फुटतात.
सतत घामामुळे आणि उष्णतेमुळे पायांच्या त्वचेचा पोत बिघडतो.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ आणि लिंबू टाकून १५-२० मिनिटे पाय भिजवून ठेवा. त्यानंतर 'प्युमिस स्टोन'ने मृत त्वचा हळुवार घासून काढा.
पाय स्वच्छ धुतल्यानंतर रात्री झोपताना टाचांना खोबरेल तेल किंवा साजूक तूप लावून मसाज करा आणि सुती पायमोजे घाला.
मधामध्ये नैसर्गिक ओलावा असतो. मध आणि कोरफडीचे जेल एकत्र करून टाचांना लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
पिकलेले केळे कुस्करून त्याचा लेप टाचांवर १५ मिनिटे लावा आणि नंतर पाय धुवून टाका.