Anuradha Vipat
तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या असली तरी ती सामाजिक संकोचाचे कारण ठरू शकते.
दात आणि जिभेवर अन्नाचे कण राहिल्याने तिथे बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे दुर्गंधी येते.
लाळ तोंड स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जेव्हा तोंडात पुरेशी लाळ तयार होत नाही, तेव्हा बॅक्टेरिया वाढतात.
पायोरिया, हिरड्यांमधून पू येणे किंवा दात किडणे यामुळे तीव्र दुर्गंधी येते.
दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने तोंड ओले राहते आणि बॅक्टेरिया धुतले जातात.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आवश्यक आहे. तसेच जीभ साफ करणे विसरू नका.
तोंडात वेलची, लवंग किंवा बडीशेप ठेवल्याने नैसर्गिकरीत्या दुर्गंधी कमी होते.