Mahesh Gaikwad
भारतात वेलची उत्पादनामध्ये केरळ राज्य आघाडीवर आहे.
केरळातील भौगोलिक स्थिती, वातावरण, माती हे घटक वेलची उत्पादनासाठी अनुकूल आहेत.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार देशातील एकून उत्पादनाच्या ५८.६४ टक्के वेलची उत्पादन केरळात होते.
केरळनंतर सर्वाधिक वेलची उत्पादनात सिक्कीम राज्याचा नंबर लागतो. सिक्कीममध्ये १९.७७ टक्के वेलची उत्पादन होते.
तर नागालँडमध्ये ८.८२ टक्के उत्पादन होते. याशिवाय अरूणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्येही वेलचीचे उत्पादन घेतले जाते.
भारतात वेलचीचे डोंगरसुध्दा आहेत. ज्याला येलामाला नावाने ओळखले जाते.
वेलचीचे हे डोंगर भारताच्या दक्षिणी भागात आहेत. हे डोंगर दक्षिण-पश्चिम तामिळनाडू आणि दक्षिण-पूर्व केरळमध्ये आहेत.