Aslam Abdul Shanedivan
भारतीय मसाले जगभर प्रसिद्ध असून यात वेगवेगळ्या मसाल्यांना महत्त्वाचे स्थान आहे
तसेच वेलची आणि काळी मिरीचे नगदी पीक म्हणून उत्पादन करणारी अनेक राज्ये असून आयुर्वेदिक औषध म्हणूनही यांचा वापर होतो
वेलची आयुर्वेदिक वनस्पती असून याचे वर्षभर उत्पादन घेता येते. तर ही चव आणि सुगंधासाठी ओळखली जाते
काळ्या मिरीला 'मसाल्यांचा राजा' म्हणून ओळख असून अनेक फायदे आहेत. काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे रसायन असते, त्यामुळे तिची चव तिखट असते.
केरळला भारतातील मसाल्यांची बाग म्हटले जाते. येथे ५८.६४ टक्के वेलची आणि ९० टक्के काळी मिरीचे उत्पादन होते
केरळमध्ये सर्वाधिक वेलची आणि काळी मिरीचे उत्पादन घेतले जात असताना त्याखालोखाल गोवा, कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड केली जाते. येथील कोकण किनारपट्टीतील हवामान या पिकाच्या लागवडीस अनुकूल असून नारळ सुपारी झाडांवर वेल चढवून मिरी लागवड केली जाते.