Anuradha Vipat
दही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, पण पावसाळ्यात ते खाण्याबाबत आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचे मत थोडे वेगळे आहे.
दही हे निसर्गाने 'अभिष्यंदी' असते. पावसाळ्यात ते खाल्ल्याने शरीरात कफ आणि पित्त दोष वाढतात.
दही पचायला जड असल्यामुळे या दिवसांत दही खाल्ल्याने गॅस, अपचन आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.
आयुर्वेदात पावसाळ्याच्या रात्री दही खाणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे.
दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे, ज्यामध्ये शरीराला फायदेशीर असणारे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात.
दही आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवते, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते
विज्ञानानुसार पावसाळ्यात बाजारातील साठवून ठेवलेले दही खाण्याऐवजी घरचे ताजे दही खाणे सुरक्षित असते.