Anuradha Vipat
केळी हे बारमाही मिळणारे, स्वस्त आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक फळ आहे.
केळी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. परंतु, अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळी केळी खाण्यास सक्त मनाई केली जाते.
"रात्री केळी खाल्ल्याने खोकला किंवा कफ होतो" असा एक मोठा समज समाजात आहे.
केळीचे गुणधर्म हे थंड, जड आणि निसर्गतः गोड असतात. आयुर्वेद सांगतो की, रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्याने शरीरातील कफ दोष आणखी वाढतो.
रात्री केळी खाल्ल्यामुळे घशात खवखव, खोकला, सर्दी किंवा छातीत कफ जमा होण्याचा त्रास होऊ शकतो.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी६ आणि पोटॅशियम भरपूर असते, जे आरोग्यासाठी उत्तम आहे.
रात्रीच्या वेळी आपले शारीरिक कष्ट कमी होतात आणि पचनसंस्था मंदावते. केळी पचायला जड असल्यामुळे रात्री ती खाल्ल्यास अपचन किंवा सुस्ती येऊ शकते.