Anuradha Vipat
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि धावपळीची जीवनशैली यामुळे कोणत्याही एका गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे.
बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मनाचा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
जेव्हा मन जास्त भरकटत असेल, तेव्हा तुमच्या सभोवतालच्या ५ गोष्टी पहा, ४ गोष्टींना स्पर्श करा, ३ आवाज ऐका, २ गोष्टींचा सुगंध घ्या आणि १ गोष्टीची चव घ्या.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा रिकाम्या वेळेत १०० पासून १ पर्यंत उलटी मोजणी करा. यामुळे मेंदूला चांगली चालना मिळते.
दररोज किमान ५ ते १० मिनिटे शांत बसा. डोळे बंद करून केवळ तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
बुद्धिबळ खेळणे, सुडोकू (किंवा शब्दकोडी सोडवणे यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होतात
कोणतेही पुस्तक वाचताना केवळ शब्द वाचू नका, तर त्यातील ओळींचा सखोल विचार करा.