Anuradha Vipat
रोजच्या आहारात आयुर्वेदिक जडीबुटींचा समावेश केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो.
आयुर्वेदानुसार, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मसाले आणि वनस्पती औषधासारखे काम करतात.
हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचे तत्व असते, जे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणांनी समृद्ध आहे. हे सांधेदुखी कमी करण्यास, त्वचा सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
आल्याला आयुर्वेदात उत्तम पाचक मानले गेले आहे. हे पोटफुगी, गॅस, अपचन आणि मळमळ होणे यांसारख्या समस्या दूर करते. तसेच हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम देते
तुळशी मानसिक ताण आणि चिंता कमी करते. यामध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे श्वसनसंस्थेचे आजार दूर ठेवतात.
आवळा हा व्हिटॅमिन-सीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे. हे शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवते.
अश्वगंधा शरीराला ऊर्जा आणि ताकद देणारी वनस्पती आहे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो, रात्री शांत झोप लागते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.