Aslam Abdul Shanedivan
जून सुरू झाला असून अद्याप मॉन्सूनचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णता वाढलेली आहे
अशा वेळी शरीर थंड ठेवण्यासह पाण्याची कमतरता भागवण्यासाठी अनेक जण लिंबाच्या रसाचं सेवन करतात
लिंबाचा रस बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते
तसेच हाच लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास अनेक फायदे मिळतात हे अनेकांना माहित देखील नसेल
वाढत्या घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर केल्यास दुर्गंधी थांबते
वाढत्या वयासह प्रदुषण आणि जेवणाच्या सवईंमुळे वेळेच्या आधी त्वचेवर सुरकुत्या येतात. त्या ठीक करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस वापरू शकता.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते