Anuradha Vipat
बाजारातून आणलेल्या पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशके आणि जंतू असतात.
पालेभाज्या फक्त पाण्याने धुण्याऐवजी काही सोप्या घरगुती पद्धती वापरून कीटकनाशकमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
मिठाच्या पाण्यात पालेभाज्या ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मीठ कीटकनाशके आणि जंतू काढून टाकण्यास मदत करते.
पांढरे व्हिनेगर टाकून पालेभाज्या १० मिनिटे ठेवा. व्हिनेगरमुळे भाज्यांवरील ९०% पेक्षा जास्त कीटकनाशके आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.
पालेभाज्या बेकिंग सोडाच्या पाण्यात ५ मिनिटे बुडवून ठेवा, नंतर चोळून घ्या आणि शेवटी नळाच्या वाहत्या स्वच्छ पाण्याने धुवा.
भाज्या निवडून झाल्यानंतर हलक्या कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून धुवाव्यात. यामुळे पानांवरील सूक्ष्म कीटक निघून जातात.
भाज्या नेहमी निवडल्यानंतर किंवा कापण्यापूर्वी धुवाव्यात. भाज्या कापल्यानंतर धुण्याने त्यातील जीवनसत्त्वे पाण्यासोबत वाहून जातात.