Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून शरीर आतून थंड आणि हेल्दी ठेवण्यासाठी आहारात खालील गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
कलिंगडात ९२% पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि थंडावा देते.
नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम स्रोत असून थकवा दूर करतो. लिंबू सरबत व्हिटॅमिन C मुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि ताजेतवाने वाटते.
दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाच्या समस्या दूर ठेवतात. पाण्यात भिजवलेले सब्जा प्यायल्याने शरीराचे तापमान लगेच कमी होते.
दुधी भोपळा, पडवळ आणि कारले या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्या पचायला सोप्या असतात.
अति मसालेदार आणि तेलकट अन्न, चहा आणि कॉफीचे अतिसेवन , जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ.
उन्हाळ्यात फ्रिजमधील अति थंड पाणी पिण्यापेक्षा मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक चांगले असते.