Team Agrowon
पृथ्वीच्या वातावरणातील एकूण प्राणवायूच्या ५० ते ६० टक्के प्राणवायू समुद्रातील वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमुळे तयार होतो.
आज आपण प्रदूषणावर झाडे लावण्याचा उपाय सुचवत असतो. पण ती जमिनीवरील झाडे किंवा जंगले जितका कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात तितकाच, किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सागरात शोषला जातो.
जगातील ४० टक्के लोकसंख्या ही अन्नासाठी विशेषतः प्रथिनांसाठी सागरावर अवलंबून आहे.
पाऊस देणाऱ्या ढगांच्या निर्मितीमागेही समुद्रच आहे. इतकेच नव्हे, तर ते ढग वाहून नेणाऱ्या वाऱ्यांच्या निर्मितीतही सागराचाच महत्त्वाचा वाटा असतो.
सागरातील जैवविविधता अन्न तर पुरवतेच, पण अनेक औषधी मूलद्रव्ये देणाऱ्या वनस्पती, सजीव या सागराच्या परिसंस्थेत आहेत.
आपण कित्येक प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या बाबतीत माहिती मिळवत आहोत, पण सागराच्या अगदी अनोख्या आणि खूप रमणीय, रोमांचक विश्वाची आपल्याला फारच कमी माहिती आहे.
समुद्रातील वनस्पती, सजीव, प्रवाळ आणि अन्य अनेक घटक यांचे जैवविविधताही जमिनीच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे. यातील अनेक घटक हे जमिनीवरील झाडांप्रमाणेच ऑक्सिजनच्या निर्मितीमध्येही मोलाची भूमिका निभावतात.
सागरातील जैवविविधता अन्न तर पुरवतेच, पण अनेक औषधी मूलद्रव्ये देणाऱ्या वनस्पती, सजीव या सागराच्या परिसंस्थेत आहेत.