Anuradha Vipat
उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीराची ऊर्जा लवकर कमी होते आणि पचनशक्तीवरही परिणाम होतो.
उन्हाळ्यात आहारात कडधान्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात मूग, मटकी किंवा चणे यांसारखी कडधान्ये प्रथिनांची गरज पूर्ण करतात .
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात होणारा बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी कडधान्ये गुणकारी ठरतात.
उन्हामुळे शरीरात येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी कडधान्ये 'इन्स्टंट एनर्जी' देतात.
कडधान्ये व्हिटॅमिन सी, ए आणि के तसेच लोहाचा उत्तम स्रोत आहेत.