Team Agrowon
काढणीनंतर फळे व भाजीपाल्याची योग्य हाताळणी ,पॅकिंग,साठवण आणि वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे दरवर्षी देशात ३० ते ४० टक्के नासाडी होते.
ही नासाडी टाळण्यासाठी फळे आणि भाज्या काढल्यानंतर त्यांची योग्य ती प्रतवारी करून पॅकिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्या बाजारपेठेत भाज्या पाठवायच्या यावरून त्याचे पॅकिंग वेगवेगळे असते. शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते.
पॅकेजिंगमुळे ब्रँड तयार होतो. खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात.
पॅकेजिंग वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
अन्नातील नासाडी कमी करते. पॅकेजिंगवर होणारी अतिरिक्त गुंतवणूक कमी करते.
हे पॅकेजिंग खाद्यपदार्थ पासून बनविले आहे म्हणून ते कमी अपायकारक आहेत.