Team Agrowon
जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे ते पीक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्माच्या संवर्धनाच्या दृष्टीने चांगले असते.
सेंद्रिय कर्बाची टक्केवारी शोधल्यास जमिनीतील एकूण नत्राच्या प्रमाणाचाही अंदाज लागतो.
सर्व वनस्पती, प्राणी आणि जिवाणूंचे कुजलेले आणि कुजलेले जमिनीतील अवशेष म्हणजेच सेंद्रिय द्रव्य होय. जमिनीतील एकूण सेंद्रिय द्रव्यामध्ये वनस्पतीचे अवशेष जास्त आढळतात.
सेंद्रिय द्रव्यात जवळपास ५८ टक्के कार्बन असतो. सेंद्रिय द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक मूलद्रव्याच्या साठवणीचे केंद्र असल्यामुळे जमिनीच्या उत्पादकतेचा निर्देशांक आहे.
सेंद्रिय द्रव्य धन आयन विनिमय क्षमता वाढविण्यासाठी, जमिनीची योग्य रचना राहण्यासाठी, जमिनीत ओलावा आणि हवेचे सुयोग्य प्रमाण राखण्यासाठी उपयुक्त असते.
जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय द्रव्याचे सूक्ष्म जिवांमुळे सतत विघटन होत असते.
जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची सर्वसाधारण मर्यादा ०.४० ते०.६० टक्के योग्य मानली जाते. अशा जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असतात.
योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीत पिकांची पोषण क्षमता योग्य असते. जमीन निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे शेतीमध्ये शेणखत, कंपोस्ट व इतर सेंद्रिय पदार्थाचा वापर फायदेशीर असतो.
Goat Milk : गायीच्या दुधापेक्षा शेळीचे दूध जास्त पोषक कसे?