Mahesh Gaikwad
भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या तेलांचा वापर शारिरीक व्याधी बऱ्या करण्यासाठी केला जातो.
भारतात पूर्वीपासून अनेक लोक संपूर्ण शरीराची तेलाची मालिश करत आले आहेत. तेल लावून शरीराची मालिश केल्याने थकवा दूर होतो.
पण शरीरासह पायाच्या तळव्यांची तेल लावून मालीश केल्याने काय-काय फायदे होतात, याची तुम्हाला माहिती आहे का?
पायाच्या तळव्यांमध्ये शरीरातील सर्व अॅक्युप्रेशर पाँइंट्स असतात. तळव्यांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे हे सर्व पाँइंट्स अॅक्टिव्ह होतात आणि शरीरातील सर्व भागाला ट्रिगर करतात.
रोज रात्री तळव्यांची मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
तळव्यांची मालिश केल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होवून आराम मिळतो आणि चांगली झोपही लागते. याशिवाय सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आराम मिळतो.
पायाच्या तळव्यांच्या अॅक्युप्रेशर पाँइंट्सची मालिश केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे तुमची त्वचाही चमकू लागते.