Anuradha Vipat
उन्हाळ्यात लिंबू खाणे किंवा लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अमृत मानले जाते.
लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि डिहायड्रेशनचा धोका टळतो
लिंबाचा रस तातडीने शरीराची झालेली झीज भरून काढतो आणि शरीराला ताजी ऊर्जा देतो
हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे उन्हाळ्यात होणारे विविध संसर्ग आणि आजारांशी लढण्याची ताकद शरीराला मिळते
कोमट पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने पचनक्रिया वेगाने सुधारते.
रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जलद गतीने कमी होते
हे कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स जमा होऊ देत नाही, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.