Aslam Abdul Shanedivan
भारतीय पोस्ट ऑफिसने १९८८ मध्ये शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना सुरू केली.
जी २०११मध्ये बंद झाली होती. ती पुन्हा २०१४ साली सुरू करण्यात आली. आता यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य देखील पैसांची गुंतवणूक करू शकतात.
किसान विकास पत्र योजना ही दिर्घ गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय असून याचे फायदे अनेक आहेत. यात ११५ महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागते
KVP या फॉर्ममध्ये उपलब्ध
KVP रु. १०००, रु. ५०००, रु. १०,००० आणि रु. ५०,००० च्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तर ५०,००० च्या वरील गुंतवणूकीसाठी पॅनकार्ड द्यावे लागते.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, बाजारात चढ-उतार होत असले तरी, तुम्हाला निश्चित रकमेची हमी मिळते.
किसान विकास पत्र ही गुंतवणुकीची सुरक्षित पद्धत असून ती दीर्घकालीन आहे. यामुळे मॅच्युरिटीनंतर चांगली रक्कम जमा होते
आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०-सी अंतर्गत किसान विकास पत्रावर १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे.