Team Agrowon
नदी जिथे समुद्राला मिळते, तिथे खाड्या असतात. या खाड्यात उभी राहिलेली असतात ती म्हणजे कांदळवने!
किनारपट्टीवर येणारे वादळ लाटा व जमिनीची धूप यांच्यापासून संरक्षण मिळते. यामुळे होणारी मनुष्यहानी टळते. मालमत्तेचे संरक्षण होते.
जंगलातून इंधनासाठी लाकूड व जहाज बांधणीसाठीचे लाकूड मिळते. येथील झाडांमध्ये असलेली नैसर्गिक रसायने ही त्वचा विकार, पचन संस्थांचे विकार या कर्करोग व उच्च रक्तदाब रोखण्यामध्ये महत्त्वाची ठरतात. त्यामुळे औषधे निर्मितीमध्ये त्यांचा वापर होतो.
खाडीतील विविध कालव, खेकडे, मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. भारतातील ४० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकांचे अन्न हे सागरी जीवनावर अवलंबून आहे. जवळ जवळ सर्व सागरी जिवांचे जन्म व संगोपन स्थान हे कांदळवन आहे.
कांदळवनांमुळे किनारपट्टी परिसराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते. सर्वप्रथम म्हणजे जमिनीची धूप होऊन गाळ समुद्रात जाण्यापासून वाचतो.
समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या वादळांना अंगावर झेलून वाऱ्याची शक्ती व वेग कमी करण्याचे काम कांदळवने करतात. या सर्व बाबींचा अनुभव गेली शेकडो वर्ष येत आहे.
त्सुनामी व तत्सम आपत्तीमध्ये समुद्रात उठलेल्या महाप्रचंड लाटांपासूनही कांदळवनांमुळेच किनारपट्टीचे रक्षण होते.
पाण्याबरोबर वाहून आलेल्या सर्व सेंद्रिय पदार्थांचे अगदी जटिल सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण विघटन होऊन पुन्हा निसर्गात मिसळण्याची प्रक्रिया इथेच होते. याच अर्थाने समुद्रासाठी ती मोठी गाळणी ही आहे.
हवेतील कर्ब वायू शोषून कार्बन जमिनीत स्थिर करण्याची कांदळवनांची क्षमता जमिनीवरील वनांच्या १० पट जास्त आहे.