Anuradha Vipat
उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्रासांवर सुंठ अत्यंत गुणकारी ठरते.
सुंठीचे चूर्ण कोमट पाण्यासोबत किंवा ताकासोबत घेतल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते
उन्हाळ्यामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी सुंठीचे पाणी गुणकारी ठरते.
जेवणाआधी थोडी सुंठ आणि सैंधव मीठ एकत्र करून खाल्ल्यास भूक वाढते.
कडक उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीवर सुंठीचा लेप कपाळावर लावल्यास त्वरित आराम मिळतो.
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे घसा खराब झाल्यास, सुंठ आणि मध चाटल्याने आराम मिळतो.
उन्हाळ्यात सुंठ घेताना ती ताकामध्ये किंवा गुळाच्या पाण्यात थोडी सुंठ घालून घेणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.