Team Agrowon
जगभरातील नागरिकांची अन्नाची गरज भागविण्यासाठी अप्रत्यक्षपणे मधमाशा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
मधमाशीपालनातून मधाचे उत्पादन तर मिळतेच पण त्यासोबत विविध पिकांच्या परागसिंचनामध्ये मधमाश्या महत्त्वाच्या ठरतात.
वाढते शहरीकरण, हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा अमर्यादित वापर, प्रदूषण आदी कारणांमुळे मधमाश्यांच्या वसाहती आणि संख्या दिवसेंदिवस वेगाने कमी होत चालली आहे.
जर पृथ्वीवरील मधमाश्यांचा नाश झाला तर काही वर्षांतच पृथ्वीवरील मानवाचा अंत होईल, अशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी नोंद करून ठेवली आहे.
पीक उत्पादनामध्ये मधमाश्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मधमाशा एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यातून दर्जेदार फळे, फुले आणि पिकांचे उत्पादन घेता येते.
मधमाशीकडून होणाऱ्या परपरागीभवनामुळे पीक उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ होते.
आज वाढते शहरीकरण, जंगल तोड, रासायनिक कीडनाशकांची अमर्यादित वापर, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे मधमाशी सारख्या इतरही उपयुक्त कीटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.