Anuradha Vipat
बार्ली वॉटर म्हणजे सातूच्या धान्यापासून बनवलेले पौष्टिक पाणी. हे पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे.
यामध्ये भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया उत्तम राहते.
हे प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
हे एक उत्तम 'डाययुरेटिक' आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून मूत्रपिंडाचे कार्य सुधारते
यातील बीटा-ग्लुकन घटक LDL कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेची चमक वाढते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
शरीरातील उष्णता कमी करून डिहायड्रेशनपासून बचाव करते.