Mahesh Gaikwad
आजच्या स्पर्धेच्या युगात कामाचा ताण, धावपळ आणि वेळेचा अभाव यामुळे वैयक्तिक आयुष्यही जगणं विसरलं जात आहे. काही खास टिप्स वापरून तुम्ही काम आणि आयुष्याचा समतोल साधू शकता.
दिवसभरात कामासाठी आणि कुटुंबासाठीही ठराविक वेळ ठरवून नियोजना करा. महत्त्वाच्या कामे प्राधान्याने करा.
तुम्ही जे काम करता तेथे कामाची अतिरेकी जबाबदारी टाळा. गरज नसलेल्या गोष्टींना स्पष्टपणे नाही म्हणा. यासाठी स्वत:ला अपराधीपणा वाटू देवू नका.
रोज काही वेळ ‘स्क्रीन फ्री’ ठेवा. हा वेळ स्वतःसाठी वापरा. यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदू रिलॅक्स होतो.
स्वतःचे आरोग्य हीच तुमची खरी स्ट्रेंथ आहे. तुमचे आरोग्य निरोगी म्हणजे तुमचे कुटुंब सुरक्षित.
सुट्टीचा दिवस हा कुटूंब, छंद, फिरणे, विश्रांती यासाठी आहे. सुट्टीचा दिवस आठवडाभराची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, तर कामाची वेळ निश्चित करा. कामानंतर कुटुंबाला वेळ द्यायचाच आहे हे लक्षात ठेवा.
जीवन जगण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहेच. काम हे आयुष्याचा एक भाग आहे ना की सर्वस्व. तुमचं मन:स्वास्थ्य, नाती आणि आनंद टिकवणे हे खरे यश आहे.