Aslam Abdul Shanedivan
बाजरी प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये पिकवली जाते. ती खाण्याबरोबर जनावरांसाठी वैरण(चारा) म्हणून वापरली जाते. पण भारतात सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? त्याबाबत ही माहिती...
देशात राजस्थानमध्ये बाजरीची लागवड करण्यासाठी माती आणि हवामान उत्तम मानले जाते. सर्वाधिक बाजरीची लागवड ही राजस्थानमध्ये केली जाते.
राजस्थानमध्ये बाजरीचे सर्वाधित उत्पादन होते. राजस्थानचा वाटा २८.०६ टक्के असून तो इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बाजरी उत्पादनात राजस्थान पहिला क्रमांक लागतो.
भारतात बाजरी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातही पिकवली जाते. येथे बाजरीचे उत्पादन 14.02 टक्के होते. त्यामुळे बाजरी उत्पादनात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बाजरी हे अतिशय फायदेशीर धान्य असून उत्पादनाच्या बाबतीत, महाराष्ट्रात 13.09 टक्के बाजरीचे उत्पादन होते. त्यामुळे कर्नाटक पाठोपाठ बाजरीचे उत्पादन सर्वाधिक येथे घेतले जाते. त्यामुळे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो
बाजरीची भाकर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. बाजरीच्या उत्पादनात उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. येथे दरवर्षी १२.०७ टक्के कापूस उत्पादन होते.
कृषी राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, हरियाणा बाजरीच्या उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. येथील शेतकरी दरवर्षी ७.०६ टक्के बाजरीचे उत्पादन घेतात.