Anuradha Vipat
आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचारपद्धती असून त्यामध्ये औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व दिले जाते.
तुळस ही आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. सर्दी, खोकला आणि घशाच्या किरकोळ तक्रारींसाठी तुळशीचा वापर केला जातो.
अश्वगंधा ही शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते.
गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
आवळा हा व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत मानला जातो. तो त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतो.
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळतो. हळद दाहशामक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
कोरफड त्वचेच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.