Anuradha Vipat
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, ताणतणाव आणि चुकीच्या खानपानामुळे केस गळणे ही एक मोठी समस्या बनली आहे.
आयुर्वेदानुसार, शरीरातील 'पित्त दोष' वाढल्यामुळे केस गळतात; म्हणूनच नैसर्गिक जडीबुटी आणि आयुर्वेदिक तेलांच्या वापराने केसांच्या मुळांना पोषण देऊन ही समस्या मुळापासून नष्ट केली जाऊ शकते.
भृंगराजच्या पानांचा रस किंवा त्याचे तेल डोक्याला लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे लगेच थांबते.
आवळा पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट स्कॅल्पवर (टाळूवर) लावल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस अकाली पांढरे होत नाहीत.
रासायनिक शॅम्पूऐवजी शिकेकाई आणि रीठाच्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. हे नैसर्गिक क्लिन्झर असून केसांमधील कोंडा दूर करतात.
आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा बोटांच्या टोकांनी टाळूवर वर्तुळाकार हलका मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि ताणतणाव कमी होतो.
आहारात कढीपत्ता, तीळ, मेथीचे दाणे, बदाम, पालेभाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करा. हे घटक केसांना आतून मजबूत करतात.