Mahesh Gaikwad
पावसाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी आरोग्यासाठी आहाराकडे विषेश लक्ष देणे गरजेचे असते. परंतु आहारात काही गोष्टी घेणे या दिवसांमध्ये टाळले पाहिजे.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका जास्त असतो. अशावेळी या दिवसांत फास्ट फूड खाण्याचे टाळले पाहिजे.
पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पालेभाज्यांमध्ये ओलाव्यामुळे जंतू वाढू लागतात. त्यामुळे या दिवसामध्ये पालेभाज्या खाताना काळजी घ्यावी.
पावसाळ्यामध्ये कच्च्या भाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या दिवसांत कच्च्या भाज्यांचे सॅलड खाणे टाळले पाहिजे.
पावासाळ्याच्या दिवसात पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो आंबट पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये चिंच, चटणी, लोणचे या पदार्थांचा समावेश असतो.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या दिवसात सी फूड खाणे टाळले पाहिजे.
तसेच पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खाणेही टाळेल पाहिजे. कारण या दिवसांत पचनक्रिया कमजोर होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.