Swarali Pawar
रब्बी कांद्याची काढणी सुरू झाली आहे आणि पुढील काही महिने साठवण महत्त्वाची आहे. योग्य चाळ नसेल तर कांदा सडतो, कोंब येतो आणि वजनही घटते.
कांद्यासाठी २५ ते ३०°C तापमान आणि ६५ ते ७०% आर्द्रता योग्य असते. जास्त आर्द्रता असेल तर सडतो, कमी असेल तर वजन घटते.
कांदा साठवण्यासाठी दोन पाखी चाळ अधिक उपयोगी ठरते. मधोमध मोकळी जागा असल्याने हवा खेळती राहते.
प्रत्येक पाखी ४ फूट रुंद आणि मध्यभागी ४ फूट मोकळी जागा ठेवा. उंची ८ फूट (मधोमध) आणि ६ फूट (बाजूने) ठेवावी.
चाळ उंच आणि पाणी न साचणाऱ्या जागी बांधावी. दोन पाखी चाळ पूर्व-पश्चिम दिशेत उभारल्यास हवा चांगली फिरते.
छप्पर उसाच्या पाचटाचे असेल तर तापमान कमी राहते. पत्रे वापरत असल्यास त्यावर पाचट टाकणे फायदेशीर ठरते.
कांद्याचा ढिग ४ फूटांपेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर सडतो. पीव्हीसी पाइप ठेवल्यास गरम हवा बाहेर पडते.
चाळीच्या जवळ जनावरं किंवा खतांची पोती ठेवू नका. यामुळे कांदा खराब होण्याचा धोका वाढतो.