Aslam Abdul Shanedivan
सातारा जिल्ह्यात १०६१ शाळा या २० पेक्षा कमी पटाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून १९ शाळांचे प्रस्ताव समूह शाळेसाठी शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आले आहेत.
त्यामुळे या शाळांवर गंडांतर येणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा झाला आहे.
शिक्षणाची गंगा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने ‘गाव तिथे शाळा’ सुरू केल्या होत्या. मात्र आता राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिफारशीनुसार समूह शाळांत केल्या जात आहेत.
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे १४ हजार ७८३ शाळा सुरू सध्या सुरू आहेत. येथे १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर २९ हजार ७०७ शिक्षक कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी ‘गाव तिथे शाळा’सुरू करण्यात आली. पण आता ही संकल्पना पुसली जाण्याची शक्यता आहे.
शाळा दूर असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल
प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल
विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी यंत्रणा
सर्वच गावांत एसटीची सोय नसल्याने सरकार प्रवास भत्त्याचं काय
एसटीची सोय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही
पावसाळ्यात वाडी-वस्तीवर रस्त्यांची दुरावस्था असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते