Team Agrowon
कोकणातील ग्रामीणसह शहरी भागात ओल्या आणि सुक्या मासळीला मोठी मागणी असते.
सध्या मात्र समुद्रात मासेच कमी मिळत असून मागणी वाढल्याने सुक्या मासळीच्या दरातही वाढ झाली आहे.
सर्वाधिक मागणी असलेल्या सुक्या सोड्यांचा दर प्रतिकिलो अडिच ते तीन हजारांवर पोहोचला आहे.
बुरोंडी, हर्णे बंदरावरील सुक्या मासळीसह अलिबाग आणि गुजरातमधील कोलीमही रत्नागिरीच्या बाजारात येत आहे.
सध्या चाकरमान्यांकडून चेवना, कोळंबी, बोंबील आणि खारा माशांना मागणी वाढली आहे.
एप्रिल, मे महिना संपत आल्यानंतर मांसाहारी खवय्यांची अडचण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदी करताना दिसत आहे.
चांगल्या प्रतीची सुकी मासळी पॅकिंग करून विकली जाते. त्यात सुके बोंबील, चेवना, बारीक कोलीम, ढोमी, मांदेली, सुरमई, शिंगटा, मुशी, वागळी आदींचा समावेश आहे.
सुक्या मासळीच्या दुकानात मासळी घेतली तर ती कमी-अधिक दरात पॅकिंगमध्ये मिळते. सोडे व कोलीम यामध्ये व्यावसायिकांकडून दर्जा राखला आहे.