Team Agrowon
बऱ्याच वनस्पती या विषारी असतात. अशा विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.
काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. मात्र त्यातील विषारी घटकांचा अंश दूध, मांस किंवा अंडी या उत्पादनांत उतरतो. त्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते.
कन्हेरीच्या बिया अत्यंत विषारी असतात.
या वनस्पतीचे सर्वच भाग जसे की पाने, फुले, शेंगा विषारी असतात.
ही वनस्पती सर्व ठिकाणी आढळते. ही वनस्पती खाल्ल्यामुळे यकृताच नुकसान करते.
ही वनस्पती खाल्यामुळे पोटदुखी, आतड्याचा दाह, रवंथ न करणे अशी लक्षणे दिसून येतात.
ही वनस्पती खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा होण्याच प्रमाण जास्त आहे.