Aslam Abdul Shanedivan
मिरची ही तिखट असते हे माहित असूनही हिच्या मोहात पडणारे अनेक असतात. तर मिरचीशिवाय अनेक पदार्थांना चवही येत नाही.
मिरचीशिवाय भारतीयांच्या अनेक घरात अन्न शिवजत नाही. यामुळे प्रत्येक घरात हिरवी किंवा लाल मिरची ही दिसते म्हणजे दिसतेच
पण जर बाजारात मिळणारी मिरची संपली तर मग काय कराल. अशी वेळी बाहेर न फिरता तुम्ही घरीच मिरचीचे रोप लावू शकता.
मिरचीच्या रोपट्याला नेहमी सूर्यप्रकाशात ठेवावे. यामुळे रोपट्याची योग्य वाढ होते. आठवडाभरानंतर पिवळी पानं छाटून टाका. यानंतर रोपट्याला हिरव्यागार मिरच्या येतील
मिरचीचे रोपटे खूप मोठे नसते. त्यामुळे हे जागा व्यापत नाही. योग्य वाढ होत नसेल तर, रोपट्याला पाणी घालण्यापूर्वी त्यात काही गोष्टी मिसळवा
एका वाटीत ५०० मिली ताक, ३० ग्रॅम मोहरीची पेंड आणि २ ग्रॅम पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार मिश्रण ३ दिवसांसाठी तसेच ठेवा, ३ दिवसानंतर मातीत मिक्स करा. यामुळे मिरच्यांनी रोपटे बहरेल