Mahesh Gaikwad
खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या मीठाच्या तुलनेत सैंधव मीठ आरोग्यासाठी फायदेशीर असते.
आहारामध्ये जास्त मीठाचा वापरामुळे किंवा जास्त प्रमाणत मीठ खाल्लामुळे रक्तदाब आणि ह्रदय विकाररासारख्या आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता असते.
आज आपण सैंधव मीठाचे आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत, याचीच माहिती पाहणार आहोत.
सकाळी सकाळी उपाशीपोटी सैंधव मीठाचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे अपचन, गॅस, ब्लोटींग आणि पोटदुखी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
याशिवाय सैंधव मीठ लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारण्यासाठी मदत करते. तसेच बॉडी डिटॉक्स होते.
सैंधव मीठ खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते.
सैंधव मीठामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थकवा आणि कमजोरी जाणवत नाही.
तसेच उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी खालावते. सैंधव मीठाचे पाणी डिहायड्रेशनसाठीसुध्दा खूप उपयोगी आहे.