sandeep Shirguppe
आघाड्याच्या पानांचे गणपतीसाठीसाठी दुर्वा म्हणून वापरली जातात, परंतु या आघाडीचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.
आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक म्हणून ओळखला जातो.
आयुर्वेदात आघाडीला महत्व आहे, अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा प्यावा.
किडनी संदर्भात काही आजार असतील, तर आघाडा अतिशय परिणामकारक ठरतो.
शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी म्हणजेच फॅटबर्नसाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात दमा, अस्थमा, खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठी आघाड्याचा परिणामकारक असतो.
दात किंवा हिरड्या दुखत असल्यास आघाड्याच्या पानांचा रस काढावा आणि तो हिरड्यांवर चोळल्यास आराम मिळेल.
पित्ताश्मरीत व अर्श रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.