Anuradha Vipat
धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अधिक मास हा महिना भगवान श्रीविष्णूंचा मानला जातो आणि या काळात केलेले दीपदान थेट विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करते.
सामान्य दिवसांपेक्षा अधिक मासात केलेल्या पूजेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने अधिक मिळते.
या महिन्यात दररोज संध्याकाळी देवाजवळ किंवा नदीकाठी दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे.
घरामध्ये नेहमी पैशांची चणचण भासत असेल किंवा कर्ज वाढले असेल, तर अधिक मासात दीपदान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.
अधिक मासात संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर शांत होतात.
ज्यांच्या कुंडलीत सूर्य, चंद्र किंवा राहू-केतूचे दोष आहेत, त्यांनी या महिन्यात रोज दिवा लावल्याने मानसिक शांतता मिळते.