Anuradha Vipat
अधिक मासाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र पण आध्यात्मिक साधनेचा काळ मानला गेला आहे.
शास्त्रानुसार, या महिन्यात केवळ भगवंताची भक्ती आणि नामस्मरण करावे.
या काळात केलेले विवाह यशस्वी होत नाहीत आणि वैवाहिक जीवनात शांतता लाभत नाही अशी मान्यता आहे.
नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूची पायाभरणी करणे टाळावे.
या महिन्यात नवीन व्यापार, दुकान किंवा भागीदारीच्या कामांची सुरुवात करू नये.
हा महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्याने तामसी अन्न आणि अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळावे.
शक्य असल्यास अन्नामध्ये लसूण, कांदा आणि जड पदार्थांचा वापर कमी करून सात्विक आहार घ्यावा.