sandeep Shirguppe
आपण दिवसभरात किती प्रमाणात मिठाचं सेवन करतो हे तुम्हाला माहिती आहे का?
WHO च्या वैश्विक अहवालानुसार, भारतातील लोक हे गरजेपेक्षा अधिक मिठाचं सेवन करतात.
अहवालात भारत देशाचा क्रमांक पहिल्या ५० देशांमध्ये येतो. भारतासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे.
सोडियमयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने, हार्ट अटॅक, लठ्ठपणा, हृदयाचे रोग, किडनीचे विकार होतात.
दिवसभरात एका स्वस्थ मानवी शरीरासाठी ४ ते ५ ग्रॅम मीठ हे आवश्यक आहे.
भारतातील लोक एका दिवसात ११ ग्रॅम पेक्षा अधिक प्रमाणात मीठ खातात. जे आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
दररोज अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शन आणि हाय ब्लडप्रेशर सारखे आजार उद्भवू शकतात.
नॅशनल हेल्थ सर्वेनुसार, प्रत्येकी चार व्यक्तींपैकी एक व्यक्तीला उच्च रक्तदाब आजार आहे.