Mahesh Gaikwad
कुत्र्याला माणसाचा मित्र म्हणतात. मानवाने शेतीला सुरूवात केली तेव्हाही कुत्रा त्याच्यासोबत होता.
कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे भारतातच काय तर जगभरात कुत्रा पाळला जातो.
घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आणायचा असेल, तर सर्वात आधी लोकांची पसंती कुत्र्यालाच असते.
परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी गंभीर झाली आहे. सातत्याने कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
अशात कुत्रा पाळण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे बनवले जात आहेत. पण भारतात असे एक राज्य आहे जिथे एक कुत्राही दिसणार नाही.
भारतातील केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा असणाऱ्या लक्षद्विप या राज्यात एकही कुत्रा दिसत नाही.
त्यामुळेच लक्षद्विपला 'रेबीज फ्री' राज्याचा दर्जाही मिळाला आहे.
इतकेच नाही तर लक्षद्विपमध्ये तुम्हाला एकही साप दिसणार नाही.