Mahesh Gaikwad
नियोजित वेळेआधीच मॉन्सून जरी केरळमध्ये दाखल झाला असला तरी, देशातील बहुतांश भागात अजूनही सुर्य आग ओकत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा चढाच राहिल्याचे दिसले. त्यामुळे अतिउष्णतेमुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्याचे दिसले.
अति उष्णतेमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. या दिवसांत डोकेदुखीच्या समस्येमुळे तुम्हीही ग्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सध्या अनेक भागात उष्णतेचा पारा ४० अंशाच्या गेल्याचे चित्र आहे. अशात स्वत:ला उष्माघाताच्या त्रासापासून वाचविणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना शरीर संपूर्णपणे कपड्याने झाकून ठेवा.
या दिवसांमध्ये गरम आणि उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा.
याशिवाय चहा-कॉफी यासारखे कॅफिन असलेले पेये पिणे टाळा.
शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करा.