Team Agrowon
पावसाच्या पाण्यावर तसच दोन महिन्यांत येणारा व कमी देखभाल खर्च असलेला वाटाणा घेण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो.
ज्वारीसारख्या पिकासाठी बेवड म्हणून वाटाणा हा चांगला पर्याय ठरु शकतो.
पुणे जिल्ह्यातील सासवड, गराडे, कोडीत, हिवरे, बोपगाव, चांबळी, सुपे, दिवे, काळेवाडी, वाघापूर, सिंगापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे आदी गावात वाटाण्याची लागवड केली जाते.
चवीला गोड असलेल्या वाटाण्याला शेतकरी आणि ग्राहकांकडून चांगली मागणी असते.
वाटाणा हे पावसावरचे पीक आहे. शिवाय ते कमी कालावधीचे म्हणजे दोन महिन्यांत येणारे पीक आहे.
वाटाण्यानंतर ज्वारीची लागवड करायची असते. दोन महिन्यात वाटणा तयार होत असल्यामुळे वाटाण्यानंतर ज्वारीची पेरणी केली जाते. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असतो.
एकूण पीक कालावधीत साधारण तीन तोडे होतात. पहिल्या दोन तोड्यांमध्ये २००, ३०० पासून ३५० किलोपर्यंत तर तिसऱ्या तोड्यांत थोडे कमी व एकूण एकरी एक टनांपर्यंत उत्पादन मिळते.
Shravan Month : ऋषी-कृषी संस्कृतीने उत्सवांची रुजवणूक करणारा श्रावण मास