Aslam Abdul Shanedivan
सरकारने महिला वर्गासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे घोषणा केली. याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात केली.
आता या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये ७ बदल करण्यात आले असून पहिलाच बदल वयात करण्यात आला आहे. आता वयोमर्यादा ६५ पर्यंत करण्यात आली आहे.
अधिवास प्रमाणपत्राची सक्ती कमी करत त्यासाठी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल
५ एकर शेत जमिनीची अट आता वगळ्यात आल्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजना लाभ घेता येणार आहे
परराज्यातील महिलांना देखील लाभ मिळणार असून त्या महिलेचा पती महाराष्ट्रातील व्यक्ती असावा. तर पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालणार आहे
२.५ लाखांच्या उत्पन्न दाखल्यात देखील बदल करण्यात आला असून पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना सुट देण्यात आली आहे.
कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे