killari earthquake : 30 वर्षांपूर्वीची 'ती' काळरात्र...

Swapnil Shinde

गणेश विसर्जनाची रात्री

३० सप्टेंबर १९९३ रोजी गणेश विसर्जनाच्या रात्री पहाटे ३:५५ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्हा हादरला.

killari earthquake | Agrowon

भूकंपाचे केंद्र

या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर किल्लारी - सास्तूर (जि. लातूर) परिसर होते.

killari earthquake | Agrowon

५२ गावे उध्वस्त

या भूकंपाचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना सर्वात जास्त फटका बसला. त्यात एकूण ५२ गावे उध्वस्त झाली.

killari earthquake | Agrowon

१०,००० लोक मृत्यूमुखी

रिश्टर स्केलवर ६.५ पातळीवर मोजल्या गेलेल्या या भूकंपात अंदाजे १०,००० लोक मृत्यूमुखी पडले तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले व ५३,००० घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली.

killari earthquake | Agrowon

परिस्थिती खूप बिकट

भूकंपामुळे घरे पडून झालेले माती दगडाचे ढिगारे आणि त्यात धो धो कोसळणारा पाऊस यामुळे दुसऱ्या दिवशी परिस्थिती खूप बिकट झाली होती. 

killari earthquake | Agrowon

शरद पवार घटनास्थळी

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले.  

killari earthquake | Agrowon

लष्कराला पाचारण

लोकांच्या मदतीला लष्कराला पाचारण करण्यात आले. संध्याकाळपर्यंत लष्कराची शेकडो वाहने किल्लारी परिसरात दाखल झाली होती. 

killari earthquake | Agrowon

पुनर्वसनाचे काम

भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूकंपानंतर २४ व्या दिवशी पाच गावांतील घरांच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. त्या मदत व पुनर्वसन कामाची जगाने नोंद घेतली. 

killari earthquake | Agrowon
swaminathan | Agrowon
आणखी पहा...