Aslam Abdul Shanedivan
मुंबई एक स्वप्ननगरी असून येथे अनेक गोष्टी इतिहासाच्या साक्षीदार आहेत. ज्या पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात.
अशीच एक इमारत म्हणजे मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनल. जी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून ओळखले जाते. जे मुंबईच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे
सुमारे २० वर्षांपूर्वी युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले. जे १३६ वर्षांपूर्वी २० जून १८८० रोजी लोकांसाठी खुले करण्यात आले. आ
जगातील सर्वात सुंदर टर्मिनसमध्ये समाविष्ट असलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनसची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट एफडब्ल्यू स्टीव्हन्स यांनी केली.
जी २.८५ हेक्टर क्षेत्रावर असून याचे बांधकाम २० जून १८७८ मध्ये सुरू झाले आणि दहा वर्षांनी ते २० जून १८८८ रोजी लोकांसाठी खुले झाले.
या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १६ लाख, १३ हजार ८६३ रुपये खर्च झाला असून त्या काळातील सर्वात महागडी आणि सर्वात सुंदर इमारत मानली जाते
१६ एप्रिल १८५३ साली येथून पहिली रेल्वे बोरी बंदर (मुंबई) ते ठाणे (सुमारे ३४ किमी) दुपारी ३.३५ वाजता धावली. तर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनानंतर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनल करण्यात आले.