Mahesh Gaikwad
अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चैत्र महिन्यातील जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरच्या आंबाबाईच्या रथोत्सवाचा सोहळा साजरा होतो.
आंबाबाईच्या रथोत्सवाला १०० वर्षांची परंपरा असून हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
चैत्र महिन्याच्या दुसऱ्या दिशी वर्षातून एकदा आंबाबाई नगगरवासियांच्या भेटीसाठी मंदीराबाहेर येते, अशी याची मान्यता आहे.
देवस्थान समितीने गेल्यावर्षी रथोत्सवासाठी नवा सागवानी रथ तयार केला आहे. या रथात आंबाबाई विराजमान होत नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते.
रथोत्सवाचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी होते. या दरम्यान मंदीर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.
रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालण्यात होत्या. त्यावरून मानकऱ्यांनी रथ मार्गस्थ केला. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी रथावर पुष्पवृष्टी केली.
रथासमोर ढोलपथक, पोलिस बँड पथक, पारंपरिक बँड पथकांनी सूर-तालाची साथ देत रथोत्सव सुरेल केला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने रथोत्सव व परिसर उजळून निघाला.
रथाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे रथातील आंबाबाईच्या मुर्तीचे मोहक रुप विलोभनिय दिसत होते.
देवीची आरती करून तोफेची सलामी दिल्यानंतर रथोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. रथापुढे मानाचा घोडा, चोपदार होते.